| • | 
									दर वर्षी युवा मंत्रा चा पुरस्कार वितरण 
									सोहळा संपन्न होतो. युवा आणि बाल 
									कलाकार, खेळाडू, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता अशा 
									विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाना 
									पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. त्यांच्यासाठी 
									ही कौतुकाची थाप असते आणि इतरांना प्रेरणादायी 
									असते. | 
								
								
									| • | 
									निरनिराळ्या स्पर्धा, मेळावे घेऊन संघटन 
									कार्य साधले जाते. | 
								
								
									| • | 
									कोजागिरी पौर्णिमा, संक्रांत, बहर मैत्रीचा 
									अशा निमित्ताने युवकांच्या कला गुणांचे 
									सादरीकरण करून त्यांना रंगमंच उपलब्ध करून 
									दिला जातो. | 
								
								
									| • | 
									व्याख्यानमाला, चर्चासत्र आणि परिसंवाद 
									आयोजित करून युवकांना स्वतःचे विचार 
									मांडण्याची, कल्पनांची देवाण घेवाण करण्याची 
									संधी दिली जाते. | 
								
								
									| • | 
									क्षमता असूनही कित्येक मुलांना नोकरी मिळत 
									नाही, अशा युवकांनी उद्योग जगतात भरारी घेऊन 
									स्वतः रोजगार निर्माण करावे यासाठी उद्योजकता 
									मेळावा भरवण्यात येतो. | 
								
								
									| • | 
									नोकरी देवाण घेवाण केंद्र मार्फत योग्य 
									नोकरीसाठी माहिती दिली जाते. | 
								
								
									| • | 
									समाजाचे ऋण फेडता यावे, सामाजिक 
									प्रश्नाकडे मुलांनी डोळस वृतीने पाहावं यासाठी 
									सामाजिक उपक्रम घेतले जातात. यामध्ये 
									निरनिराळ्या सामाजिक संस्थाना  सेवाभावी 
									संस्थाना भेटी देणे, विशेष मुले किंवा अपंग 
									सैनिक यांच्या बरोबर सण साजरे करणे, रक्तदान 
									शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता फेरी असे विविध 
									कार्यक्रम घेतले जातात. 
  |